Posts

Showing posts from July, 2020

#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

वातावरणातील फेरबदल....

Image
नमस्कार मित्रमंडळींनो...               दररोजच्या या धावपळीच्या दूनियेमधून सगळ्यांनाच थोडसं relaxation हवं असतं.मग ते कोणीही असो शाळेत, कॉलेज मध्ये शिकणारे मुल किंवा नोकरी करणारी मोठी माणसं.कॉलेज च्या मुलांसाठी असते ती म्हणजे सहल. सहली चा विषय निघाला की सगळ्यांना एका वेगळ्या प्रकारची उत्सुकता लागलेली असते.मस्त खायचं प्यायचा ,मज्जा करायची,इकडे तिकडे फुलपाखरां सारखं बागडायच,खेळ खेळायचे आणि अजुन काय काय. मुलांच्या मनात किती प्रश्न येतात.कुठे जायचं,कधी जायचं,किती दिवस जायचं,कुठे कुठे फिरायच,काय न्यायचं ? बापरे.. आमचे तर कसे एकदम मज्जेचे दिवस आल्यासारखं वाटत होतं .आधी सहल नंतर स्नेह संमेलन हे सगळं मागोमाग असल्याने आमच्या कॉलेज मध्ये पालकांची सभा भरवण्यात आली होती.सभेचा विषय तर आम्हाला माहितच होता.पण सहल कुठे जाणार,कधी जाणार हे माहीत नव्हतं.पालकांची सभा झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की आमची सहल ७ दिवसांसाठी बँगलोर ला जाणार आहे.             खरं तर ते ऐकून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता.पण जस एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसे माझ्या मनात विचार येत होते.एक बाजू म्हणायच